महानगरात सार्वजनिक शौचालये किती व कशी असावीत याचे मापदंड स्वच्छ भारत अभियानातून देण्यात आले आहे. मात्र, अजूनही सार्वजनिक शौचालयांची स्थिती दवनीय आहे. २०२३ सालच्या आकडेवारीनुसार महानगरांतील एकूण सार्वजनिक शौचालयांपैकी ६८०० म्हणजे ६९ टक्के सार्वजनिक शौचालयांमध्ये पाणी व ६० टक्के शौचालयांत वीज जोडणीच झालेली नसल्याचे प्रजा फाऊंडेशनच्या अहवालातून समोर आले आहे. यात स्त्रियांसाठी शौचालयांची संख्या अपुरी आहे. दर ४ सार्वजनिक शौचालयांतील केवळ १ शौचालय स्त्रियांसाठी उपलब्ध आहे. एकूणच लोकसंख्येच्या तुलनेत शौचालयांची संख्या कमी व असुविधांयुक्त असल्याचे निरीक्षण प्रजा फाऊंडेशनने मांडले आहे.