महाराष्ट्र टाइम्स
एक पालिका, लाख तक्रारी
घनकचरा व्यवस्थापन, प्रदूषण नियंत्रण, पाणीपुरवठा, मलनिःसारणासह अन्य सुविधांसाठी मुंबई महापालिकेकडून वर्षाला हजारो कोटींची तरतूद केली जाते. मात्र ही तरतूद करूनही नागरी समस्या 'जैसे थे'च राहात आहेत. या समस्यांविषयी मुंबईकरांनी सन २०२४मध्ये तब्बल एक लाख १५ हजार ३९६ तक्रारी मुंबई महापालिकेकडे केल्या आहेत. सन २०१५मध्ये ६७ हजार ७७३ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे २०१५च्या तुलनेत सन २०२४मध्ये यात ७० टक्क्यांनी वाढ झाली आहे.