प्रजा फाऊंडेशनने 'मुंबईतील नागरी समस्यांची सद्यस्थिती 2025' हा अहवाल आज प्रेस क्लब येथे प्रसिद्ध केला. या अहवालात मुंबईतील स्वच्छता व आणि वायू प्रदूषण समस्यांची माहिती देण्यात आली आहे. मुंबईसारख्या महानगरात सार्वजनिक शौचालये किती व कशी असावीतस याचे मापदंड स्वच्छ भारत अभियानातून देण्यात आले आहेत. मात्र लोकसंख्येनुसार सार्वजनिक शौचालयांची अवस्था अत्यंत खराब असल्याचे अहवालात म्हटले आहे. दरम्यान, नागरिकांच्या तक्रारींचे वेळेत निवारण करावे, मुंबईकरांचे अभिप्राय घेऊन पारदर्शकता वाढवावी, अशी मागणी प्रजा फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद म्हस्के यांनी केली आहे.