हिंदुस्थान पोस्ट
मुंबई पोलीस दलातील अपुऱ्या मनुष्यबळामुळे गुन्ह्यांचा तपास घटला
बलात्कार, विनयभंग यासारख्या गंभीर गुन्ह्यामध्ये मुंबई शहरात मागील काही वर्षात मोठी वाढ झाली आहे, परंतु या गुन्ह्याच्या तपासात घट झाल्याचे प्रजा फाउंडेशनच्या अहवालात समोर आले आहे. मुंबई पोलीस दलात अपुऱ्या मनुष्यबळामुळे गुन्ह्याच्या तपासात घट आढळून येत असून मुंबई पोलीस दलात पोलीस निरीक्षक ते पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिका-यांमध्ये २२ टक्के घट असल्याचे प्रजा फाउंडेशनच्या अहवालात म्हटले आहे.