तरुण भारत
मुंबईत सायबर गुन्हे, बलात्कार वाढले, खटले अनेक वर्षे प्रलंबित, गुन्ह्यांचा तपास लागण्याचे प्रमाणही अगदी नगण्य

जगभरात सगळीकडेच सायबर गुन्ह्यांचे प्रमाण कमालीचे वाढले असून देशाची आर्थिक राजधानी मुंबईही त्याला अपवाद नाही. मुंबईमध्ये २०१८ ते २०२२ यादरम्यान सायबर गुन्ह्यांत थोडीथोडकी नव्हे तर तब्बल २४३ टक्क्यांनी वाढ झाली.