वृत्तमानस
मुंबईत 4 वर्षांत सायबर गुन्ह्यांत 243 टक्क्यांची वाढ, प्रजा फाऊंडेशनच्या अहवालात धक्कादायक बाब उघड

जगभरात सगळीकडेच सायबर गुन्ह्यांचे प्रमाण कमालीचे वाढले असून आणि मुंबईही त्याला अपवाद नाही. मुंबईमध्ये सन २०१८ ते २०२२ या दरम्यान त्यात २४३ टक्क्यांनी वाढ झाली असून यामध्ये क्रेडीट कार्ड घोटाळे / फसवणुकीचे सायबर गुन्हे सर्वाधिक नोंदवलेले असून त्यांचे प्रमाण ६५७ टक्क्यांनी वाढले असल्याची माहिती प्रजा फाउंडेशनच्या माध्यमातून समोर आली.