महासागर
मुंबईतील वायुप्रदुषणाच्या तक्रारींमध्ये २३७ तर घन कचरा व्यवस्थापनेच्या १२४ टक्क्यांनी वाढ

मुंबईमध्ये घन कचरा व्यवस्थापनेसंबंधी नागरिकांच्या तक्रारी १२४% नि वाढल्या आहेत. वायुप्रदुषणाच्या संबंधी नागरिकांच्या तक्रारी २३७% नी आणि मल:निसरणासंबंधी नागरिकांच्या तक्रारी ३५% नी वाढल्या असून सन २०२२ मध्ये या तक्रारी सोडवण्याचा सरासरी अधिकतम कालावधी ३१ दिवस असल्याचे प्रजा फाउंडेशनच्या अहवालातून समोर आले आहे.