मुंबई शहरामध्ये गेल्या दहा वर्षांत गुन्हेगारीत कमालीची वाढ झाली आहे . 2012 ते 2021 या कालावधीत गंभीर गुन्ह्यामध्ये 112 टक्याने वाढ झाली आहे .अपहरणाच्या गुन्ह्यांमध्ये 650 टक्के तर बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये 235 टक्यांनी वाढ झाल्याचा दावा प्रजा फाऊंडेशन या संस्थेने प्रेस क्लब मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत केला.