लोकसत्ता
महापालिकेबाबत तक्रारी वाढल्या! तक्रारींमध्ये ७० टक्के वाढ; प्रदूषण, शौचालय, घनकचरा संबंधी तक्रारीत ३०० टक्क्यांनी वाढ
मुंबई महापालिकेशी संबंधित विविध विषयांवरील तक्रारींमध्ये गेल्या दहा वर्षात ७० टक्के वाढ झाली असून घनकचरा व्यवस्थापन, पाणी, शाळा, रस्ते, शौचालय अशा विविध विषयांवर २०२४ या वर्षात मुंबईकरांनी तब्बल एक लाखाच्यावर तक्रारी केल्या आहेत. त्यातही प्रदूषण, शौचालय, घनकचरा संबंधी तक्रारीत ३०० टक्क्यांनी वाढ झाली आहे. प्रजा फाऊंडेशनने प्रसिद्ध याबाबत अहवाल प्रसिद्ध केला आहे.